लघुपाटबंधारे विभाग

लघुपाटबंधारे विभाग

प्रस्तावना

आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकर्‍यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतकर्‍यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, ग्राम तलाव, को.प.बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.

अशा ० ते १०० हेक्टर सिचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडे लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ११ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, खटाव, फलटण, कराड व जिल्हा परिषद निर्मित खंडाळा अशा पाच व ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग कोरेगाव व वाई व जवळी या तीन उपविभागामार्फत केली जातात.

या विभागाकडून करण्यात येणार्‍या विविध कामांची माहिती

पाझर तलाव/ग्राम तलाव

पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भुस्तरीय स्थळावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते. अशा प्रकारे साठविलेले पाणी पाझरून तलावाच्या खालील भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविणेस या तलावांचा उपयोग होतेा. या तलावापासून होणारे सिचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिचन असते. तलावातील उपलब्ध पाण्याच्या उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.

कोल्हापुर पध्दतीचे बंधारे

नदी किवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बंाध व झडपाद्धारे (फळया टाकून) अडविले जाते. यास केाल्हापूर पंध्दतीचे बंधारे असे म्हणतात. या मधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतीला पाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी को.प.बंधार्‍याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधार्‍यामध्ये पाणी अडवून सिचन केले जाते.

वळण बंधारे

सदरचे बंधारे हे सतत वाहत्या ओढयावर या पध्दतीने बांधण्यात येतात की, वाहणारे पाणी झडपाद्धारेअडवून ठेवण्यात येते व पाटाद्धारे ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतीस सिचनासाठी वापरण्यात येते. या बंधारेद्धारे प्रत्यक्ष सिचन केले जाते व सदरचे बंधारे हे जेथे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणीच बांधण्यात येतात.

या विभागाकडील विविध लेखाशिर्षाखालील माहिती

जिल्हा वार्षिक योजना

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ५ ल.पा.सामान्य कामे व ५ ल.पा. को.प.बंधारे या लेखाशिर्षा अंतर्गत या विभागाकडे एकुण १४९ कामे होती. त्यापैकी ११५ कामे पुर्ण झालेली असून २ कामे रद्द करण्यात आले. उर्वरीत ३२ कामे प्रगतीपथावर आहेत व दोन्ही लेखाशिर्षाखाली रक्कम रुपये १४४३.३२ लक्ष ऐवढे अनुदान खर्च करण्यात आलेला आहे.

जलयुक्त शिवार

सन २०४१५-१६ मधील जलयुक्त शशवार अशभयान योजनेमधील ९५ कामे होती त्यापैकी सन२०१६-१७ मध्ये ९३ कामे पूणस झाली व २ कामे रद्द करणेत आली व या कामावर एकूण रक्कम रुपये ६१८.४६ लक्ष इतका खर्च झालेला आहे.

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडण्यात आलेल्या २१० गांवापैकी या विभागाकडे जलयुक्त शिवार लेखाशीर्षाअंतर्गत एकुण २१९ कामे हाती घेण्यात आलेले आहेत त्यापैकी ९९ कामे पूर्ण झालेली आहेत त्यावर दिनांक ३०/०६/२०१७ अखेर ७६९.४९ लक्ष इतका निधी खर्च करणेत आलेला आहे. उर्वरित १२० कामापैकी ६९ कामे प्रगतीपथावर असून ४८ कामे निविदा कार्यवाहीत आहेत व ३ कामे रद्द प्रस्ताववत आहेत.