जल जिवन मिशन
मिशन
जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे की:
- 
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आणि सार्वजनिक संस्थांना (शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती) फंक्शनल टॅप कनेक्शन (FHTC) द्वारे सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करणे. 
- 
ग्रामपंचायती आणि ग्रामीण समुदायांना सक्षम करणे, जेणेकरून ते स्वतःच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, संचालन आणि देखभाल करू शकतील. 
- 
पाणी व्यवस्थापनात समाजाची सक्रिय भागीदारी, जागरुकता वाढवणे, आणि जीवनमान उंचावणे. 
- 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009-10) चे पुनर्रचना करून 30 जून 2020 पासून जल जीवन मिशन म्हणून अंमलबजावणी. 
उद्दिष्टे
- 
सर्व ग्रामीण कुटुंबांना FHTC देणे. 
- 
प्राधान्य गावे: गुणवत्ता प्रभावित क्षेत्र, दुष्काळग्रस्त, वाळवंटी भाग, SAGY अंतर्गत गावे. 
- 
शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, जीपी इमारतींना टॅप कनेक्शन देणे. 
- 
टॅप कनेक्शनच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण करणे. 
- 
दीर्घकालीन पाणीपुरवठा शाश्वततेसाठी पायाभूत सुविधा आणि निधीची तरतूद. 
ठळक मुद्दे
- 
दररोज प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लिटर पाणी FHTC द्वारे पुरवठा करणे. 
- 
50% केंद्र आणि 50% राज्य सरकारची आर्थिक भागीदारी. 
- 
ग्रामपंचायतीकडून 10% लोकवर्गणी, देखभाल व दुरुस्तीसाठी. 
- 
वैयक्तिक गाव योजना आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश. 
- 
टिकाऊ उपाय: बोअरवेल पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन. 
- 
योजनेनंतर ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे योजना हस्तांतर. 
JJM अंतर्गत घटक
- 
गावांमध्ये पाइपव्दारे पाणीपुरवठा पायाभूत सुविधा विकसित करणे. 
- 
पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत निर्माण/वाढवणे. 
- 
गरजेनुसार मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण आणि वितरण यंत्रणा उभारणे. 
- 
दूषित पाण्याचे तांत्रिक उपाय. 
- 
रेट्रोफिटींगद्वारे जुनी योजना सुधारून FHTC पुरवणे. 
- 
ग्रे वॉटर व्यवस्थापन. 
- 
सहाय्य उपक्रम: - 
IEC (माहिती, शिक्षण, संप्रेषण) 
- 
HRD (मानवी संसाधन विकास) 
- 
प्रशिक्षण 
- 
जल गुणवत्ता प्रयोगशाळा 
- 
पाणी गुणवत्ता चाचणी व निरीक्षण 
- 
R&D 
- 
ज्ञान केंद्र 
- 
समाज क्षमता वाढवणे 
 
- 
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
पिण्याचे पाणी
अर्ज कसा करावा
वरील प्रमाणे
 
         
        